एकतर सामग्री निर्माता किंवा उपयोगकर्ता म्हणून, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम किंवा स्पॅनचॅट सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांची संख्या दररोज लक्षणीय प्रमाणात वाढत आहे.सुरुवातीला, जेव्हा हे प्लॅटफॉर्म इतके लोकप्रिय नव्हते,तेव्हा लोक सिने तारकांना पाहून प्रभावित व्हायचे. परंतु ,आता आपण आपल्या वास्तविक जीवनात ओळखत असलेल्या लोक - मित्र आणि कुटुंबीयांद्वारे प्रभावित होतो. काही माणसे अत्यंत वेगाने यशाच्या शिखरावर जाऊन पोहचतात काही लोक आपल्या किती पुढे गेलेत? असं वाटत आणि आपण स्वतः वरील आत्मविश्वास गमावू लागतो. पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे कि कोणी आपले दैनंदिन सांघर्ष किंवा अपयश लोकांसमोर ठेवत नाही आपले जीवन किती परिपूर्ण आहे हे सांगण्यासाठी लोक त्यांच्या जीवनातील दु: खी भाग लपवतात. याचा परिणाम आपल्या सर्वांवर होतो, परंतु मुख्यतः आधीपासून कमी आत्मविश्वास असलेल्या लोकांना ह्या गोष्टी अधिकच तणावात आणतात आणि ते स्वतः ची तुलना करू लागतात
फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मचा वाढता उपयोग लोकांमध्ये नैराश्याला कसा कारणीभूत ठरू शकतो हे अनेक पत्रकांद्वारे तसेच लेखांद्वारे दिसून आले आहे. लोकांना आता प्रमाणीकरणाची अधिक गरज आहे आणि आजूबाजूच्या प्रत्येकास ते प्रभावित करू इच्छित आहेत. त्या मुळे ते शारीरिक दृष्ट्या परिपूर्ण दिसण्यासाठी नेहमीच कार्यरत असतात. परंतु जे लोक या गोष्टीचा नियमित वापर करतात ते आता आत्म-संशयाच्या जगात जगताना दिसत आहेत. असे बरेच लोक आहेत जे आपल्या भावना आणि दुःख आपल्या इंस्टाग्राम फीड च्या मागे लपवून ठेवून आहेत.
सोशल मीडिया ही समस्या नाही.पण कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त केलेला वापर हा आपल्यासाठी हानीकारक ठरू शकतो हे लक्षात घेणेही तितकेच आवश्यक आहे
जाहिराती सामान्यत: सामान्य प्रेक्षकांसाठी तयार केल्या जातात. सोशल मीडिया जसे की इन्स्टाग्रामवर बरीच प्रायोजित सामग्री असते. विशिष्ठ जाहिराती आपलं लक्ष वेधून घेतात. बऱ्याचदा या जाहिरातींमध्ये एखाद्या सेलेब्रेटीचा फोटो किंवा एखादी आकर्षक वस्त्रे परिधान केलेली व्यक्ती असू शकते. या व्यक्ती वास्तविक जीवनात आपल्याला उपयुक्त नसलेल्या गोष्टी कश्या उपयुक्त आहे हे पटवून देण्यात माहीर असतात. सोशल मीडिया वरील ह्या जाहिरातीं मुळे नकळतच आपलं आपल्या ध्येयांपासून दूर होतो आणि वास्तविक जीवनात आवश्यक नसलेली उद्दिष्ट साध्य करण्याची इच्छा व्यक्त करतो ज्यामुळे आपल्या स्वाभिमानावर परिणाम होतो.
अलीकडच्या काळात सोशल मीडिया प्रेरणेऐवजी तुलना करण्याचे साधन बनले आहे. खरेतर सोशल मीडिया चा उगम आपल्या मित्र परिवारा सोबत सवांद साधण्यासाठी झाला पण आता मात्र त्याचा वापर स्वतःची तुलना करण्यासाठी केला जात आहे. आपल्या खात्यातील कोणत्याही व्यक्ती पेक्षा परिपूर्ण दिसण्यासाठी सतत केलेली लढाई मग ती कुटुंबातील एखाद्या व्यक्ती सोबत असो किंवा मित्रमंडळीसोबत पण स्वतः ला वरचढ ठरवण्याच्या या शर्यतीचा आपल्यावर चांगला असा परिणाम होत नाही बहुतेकदा त्यामुळे आपलाच आत्मा विश्वास कमी होतो.
इतर लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांची पसंती मिळवण्यासाठी आपण नेहमी धडपड करत असतो. लोकांनी आपले कौतुक करावे अशी भावना मनात असणे ठीक आहे. परंतु असंख्य हॅशटॅग वापरून मिळवलेली पसंती क्षणभर असते आणि ती जास्त काळ टिकेलच अस नाही.त्यामुळे तुम्हाला हवातसा प्रतिसाद न मिळाल्यास तुम्ही निराश होता आणि स्वतः ला दोष देऊ लागता.
सायबरस्पेस कनेक्शन खरोखर वास्तविक नाहीत. काही जण विश्वासार्ह लोकांना शोधू शकतात आणि सोशल मीडियावर काही आश्चर्यकारक मित्र बनवू शकतात, तर बहुतेक कनेक्शन बनावट असतात.बनावट, त्यांच्या ओळखीच्या अर्थाने नाही तर ही नाती वास्तविक-जगातील मैत्रीसारखे नसतात आणि कदाचित ती जास्त काळ टिकत नाहीत. कधी कधी आपल्याला इंटरनेट वर भेटलेली माणस खूप जवळची वाटू लागतात आणि त्यांचा आपल्या जीवनावर खूपच प्रभाव असतो त्यामुळे त्यांनी एखाद्या विषयावर तुमच्यावर केलेली चांगली किंवा वाईट टिपणी तुम्हाला विचार करण्यास भाग पडते जेणेकरून तुमचा आत्मविश्वास खालावतो अशा नात्यांपासून दूर राहणे नेहमीच चांगले असते.
स्किनकेअर, परफेक्ट आई मेकअप, केक बेकिंग किंवा ड्रेसिंगबद्दल असलेले असंख्य वायरल विडिओ आपले लक्ष वेधून घेतात. आपल्याला नेहमीच या गोष्टींबद्दल कुतूहल वाटते आणि आपणही या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपण नवशिक्या असल्याने आपली अपयशी होण्याची शक्यता जास्त असते आणि आपल्याला अपेक्षित असा प्रतिसाद न मिळाल्याने आपण निराश होऊ शकतो.
delaing
सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे सोशल मीडियाचा आपल्यावर प्रचंड प्रभाव आहे. आपण पाहू शकता की आपण जे काही पाहता त्याचा आपल्यावर प्रत्यक्षरित्या प्रभाव पडत नसला तरी परंतु अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्या मनात राहतात आणि इंटरनेटवर जे काही घडते त्याचा आपले मन आपल्या वैयक्तिक जीवनाशी संबंध साधू लागते आणि आपल्या बाबतीतही तसे घडू शकते असा विश्वास निर्माण करते. यामुळे तुमच्या चिंतेत वाढ होऊ शकते सोशल मीडिया होणाऱ्या वाईट टिपण्या तुमच्या मनावर परिणाम करू शकतात.
गोष्टी नेहमीच ठरल्याप्रमाणे कार्य करत नाहीत. आपण प्रयत्न करत असलेल्या एखाद्या गोष्टीमध्ये आपण अयशस्वी होऊ शकतो, तर बरेच लोक त्याच गोष्टीत यशस्वी होतील आणि आपला सोशल मीडिया वर साजरा करतील .अशा गोष्टींमुळे निराश होऊ नका. सोशल मीडियाचा प्रभाव तुमच्या स्वाभिमानावर पडू देऊ नका. त्याऐवजी, आपल्या अपयशासंदर्भात एक चांगला प्रतिसाद तयार करा आणि स्वतःची इतरांशी तुलना करण्याऐवजी आपल्या अपयशाचा उत्पादित पाने सामना करा.
जर तुम्ही सोशल मीडिया वर काही काम नसताना जास्त वेळ घालवत असाल तर ते तुमच्या आरोग्यास हानिकारक होऊ शकते तेव्हा त्यापासून थोडा वेळ दूर राहा. सोशल मीडिया चा तुमच्या आत्मविश्वासावर प्रभाव पडतो आणि आपण स्वतः वर शंका निर्माण करू लागतो. नकारात्मक टिपण्या आणि ट्रोल्स सह आपले मानसिक आरोग्य आणखीनच बिघडू शकते. जर तुम्ही ही अशा समस्यांना सामोरे जात असाल तर डिजिटल जगापासून थोडा वेळ डिस्कनेक्ट होणे आणि स्वतः साठी वेळ देणे तुमच्याच हिताचे ठरेल.
आपण करीत असलेल्या कामाचे कधीकधी आपल्याला अपेक्षित असे परिणाम मिळत नाहीत तेव्हा निराश होऊ नका आणि स्वतः चे कौतुक करा. तुम्हाला तुमच्या पोस्टवर एक हजार लाईक्स मिळतीलच असे नाही. परंतु ,परंतु स्वतः ची काळजी घेतल्या बदल तुम्ही नकीच कौतुकास पात्र आहात. आपल्यात असलेल्या उणीव लपवण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यातील अडचणींपासून दूर जाण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेऊ नका, त्याऐवजी आपली पाठ स्वतःच थोपटून घ्या आणि स्वतः चा अभिमान बाळगा.
0 Comments